राजकीय पोस्ट, चर्चा केली तर मित्र दुरावतात म्हणे, मैत्रीत वाद होतात... हे एक नवेच सुरू झालेय. मैत्रीचा राजकारणाशी काय संबंध. माझे मित्र, नातेवाईक, सहकारी गेली अनेक वर्षे सगळ्या पक्षात आहेत मग आताच ही हाकाटी कशासाठी. मैत्रीत वितुष्ट येतही असेल पण त्याला फक्त राजकारण जबाबदार नाही.
राजकीय लिहिणारे, चर्चा करणारे नालायक असे काहीसे बोलणे दिसू लागलेय ह्याला माझा कडाडून विरोध आहे. राजकीय चर्चा वैयक्तिक व्हायची गरजच नसते, ते तिथल्या तिथे सोडून द्यायचं असतं. स्क्रीनशॉट खेळणारे, ह्याला टार्गेट कर त्याला टार्गेट कर, एखाद्याची ठरवून बदनामी कर, गॉसिप कर, इनबॉक्सला भिड असले धंदे करणारे राजकीय पोस्टींना नावं ठेवतात तेव्हा गंमत वाटते.
ना मोदी कुणाचे सगे आहेत ना रागा. ती राजकीय व्यक्तिमत्त्वे आहेत त्यांच्यावर बोलण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. अर्थात जो तो आपल्या लायकीच्या भाषेत बोलतो आणि राजकीय व्यक्तींना, नेत्यांना पूर्ण कल्पना असते की त्यांना काय बोललं जातं. व्यक्तिशः मी मोदी, राहुल, पवारसाहेब, केजरीवाल आणि सगळ्या राजकीय नेत्यांचे ह्याबद्दल खूप कौतुक करते की ते इतकी टीका सहन करूनही राजकारणात ठामपणे उभे आहेत.
राजकीय टीकाटिप्पणी चर्चा होत राहील, त्याला कुणीही वाईट ठरवू नये. जे राजकीय नाहीत अशा आपल्या ओळखीच्या लोकांची बदनामी करणाऱ्यांना धारेवर धरा, तिकडे गप्प बसून एन्जॉय करणाऱ्यांना राजकीय पोस्टींचा त्रास का व्हावा. अनेकदा अनेकांना पर्सनली ट्रोल केले गेले त्याबद्दल कुणीही आवाज उठवत नाही आणि राजकीय पोस्टवर मात्र आक्षेप असतो. हे डबल स्टँडर्ड बंद करा.
उद्या निकाल काहीही आले तरी शिरोधार्य असतील, सत्ताधारी कुणीही असले तरी चुकेल तिथे बोलणारच.
जो जे वांच्छिल तो ते लाहो
©अर्चना चंद्रसेन
राजकीय लिहिणारे, चर्चा करणारे नालायक असे काहीसे बोलणे दिसू लागलेय ह्याला माझा कडाडून विरोध आहे. राजकीय चर्चा वैयक्तिक व्हायची गरजच नसते, ते तिथल्या तिथे सोडून द्यायचं असतं. स्क्रीनशॉट खेळणारे, ह्याला टार्गेट कर त्याला टार्गेट कर, एखाद्याची ठरवून बदनामी कर, गॉसिप कर, इनबॉक्सला भिड असले धंदे करणारे राजकीय पोस्टींना नावं ठेवतात तेव्हा गंमत वाटते.
ना मोदी कुणाचे सगे आहेत ना रागा. ती राजकीय व्यक्तिमत्त्वे आहेत त्यांच्यावर बोलण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. अर्थात जो तो आपल्या लायकीच्या भाषेत बोलतो आणि राजकीय व्यक्तींना, नेत्यांना पूर्ण कल्पना असते की त्यांना काय बोललं जातं. व्यक्तिशः मी मोदी, राहुल, पवारसाहेब, केजरीवाल आणि सगळ्या राजकीय नेत्यांचे ह्याबद्दल खूप कौतुक करते की ते इतकी टीका सहन करूनही राजकारणात ठामपणे उभे आहेत.
राजकीय टीकाटिप्पणी चर्चा होत राहील, त्याला कुणीही वाईट ठरवू नये. जे राजकीय नाहीत अशा आपल्या ओळखीच्या लोकांची बदनामी करणाऱ्यांना धारेवर धरा, तिकडे गप्प बसून एन्जॉय करणाऱ्यांना राजकीय पोस्टींचा त्रास का व्हावा. अनेकदा अनेकांना पर्सनली ट्रोल केले गेले त्याबद्दल कुणीही आवाज उठवत नाही आणि राजकीय पोस्टवर मात्र आक्षेप असतो. हे डबल स्टँडर्ड बंद करा.
उद्या निकाल काहीही आले तरी शिरोधार्य असतील, सत्ताधारी कुणीही असले तरी चुकेल तिथे बोलणारच.
जो जे वांच्छिल तो ते लाहो
©अर्चना चंद्रसेन