प्रवास म्हणण्या इतकं काही मी लिहिलं नाहीये पण भक्कम शब्द वाटतो म्हणून लिहिलाय हे आधीच स्पष्ट करते ☺ दुसरं म्हणजे ही मतं मागण्यासाठी #जाहिरात एज ईट इज नसून स्वतःला व्यक्त करण्याची संधी समजते, आणि संधीसाधूपणा करून लिहितेय 😁😂
लहानपणापासून वाचनाची खूप गोडी पण लेखन म्हणाल तर शाळेत पेपर सोडवण्यापलीकडे काहीही लिहिलं नाही, नंतर नोकरीत ऑफिसमध्ये कामाची पत्रं आणि नोट्स लिहिणे अशी थोडीशी प्रगती झाली. 2009 पासून फेसबुकवर आहे पण खरं लेखन सुरू झालं ते कुबेरवरच, इतरांच्या पोस्ट वाचून लाईक करणे, जास्त ओळखपाळख नसल्याने भीतभित कमेंट करणे असा प्रकार समूहावर नवीन असताना सुरू असे. श्रावण महिन्यात संतोषभाऊंनी चारोळी स्पर्धा सुरू केल्या, चित्रं बघून त्यावर चारोळ्या लिहायच्या आणि इथेच प्रेरणा मिळाली आणि मी लिहायला लागले. स्पर्धा म्हटली की का कुणास ठाऊक मला ते चॅलेंजिंग वाटतं त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत मी भाग घेते(अर्थात झेपेल त्या स्पर्धेत 😛) त्यापुढे समूहाच्या कथास्पर्धेत भाग घेतला तेही जमतंय का बघितलं. हळूहळू धाडस येत गेलं आणि लिहीत गेले त्यातून हिम्मत आली आणि स्वतंत्र पोस्ट लिहू लागले. दाद द्यावी ती कुबेरकरांनीच , भरभरून दाद देतात त्यातून आत्मविश्वास वाढतो हा स्वानुभव आहे. मी कुबेरप्रमुखांचे खूप आभार मानते केवळ त्यांच्यामुळे मी लिखाण करू लागले.
माझा एक मित्र आहे त्याने मला ब्लॉग सुरू करून दिला. तो म्हटला ब्लॉग सुरू कर तर म्हटलं तूच सुरू करून दे, दिला करून बिचाऱ्याने 😃. तू लिहीत जा म्हणून खुप प्रोत्साहन द्यायचा, मी लक्ष देत नाही म्हटल्यावर त्याने घरचा अभ्यास दिल्यासारखे विषय द्यायला सुरुवात केले 😁😂. तू रणछोडदासवर लिही, कधी अहिल्येवर लिही असं करून भरपूर लिहून घेतलं. हे सगळं लिखाण माझ्या ब्लॉगवर आहे. मत द्या की नका देऊ ब्लॉगला मात्र जरूर भेट द्या
No comments:
Post a Comment