अपूर्णता, दुर्लक्षित राहिल्याची भावना, सतत आपल्यावर अन्याय-अत्याचार होतात हे विचार माणसाला बंडखोर बनवतात. मनामध्ये एक आग खदखदत असते. इतर माणसांसारखेच आपण आहोत तरी आमच्यावर अन्याय आणि भेदभावाची वागणूक का? हे प्रश्न मनात भेडसावू लागले की पुढची वाटचाल फार कठीण असते. ह्यातूनच अतिरेकी विचारांची निर्मिती होत असावी.
स्वतः सबळ होणं, शिक्षित आणि सक्षम होणं हाच एकमेव मार्ग असतो जो आपल्यातली न्यूनगंडाची भावना आणि त्यातून तयार होणारी बंडखोरी कमी करतो. जगातले दोन लढे ह्याबाबत आदर्श असे आहेत. काळ्यांची समानतेसाठीची लढाई आणि महाराष्ट्रातील दलितांची सामाजिक उत्थानाची लढाई. काळे आणि दलित शतकानुशतके अन्याय सहन करून पिचलेले होते , संघर्ष करून त्यातून ते बाहेर आले. ह्या दोन्ही लढ्यात त्यांना मिळालेले नेतृत्व असामान्य होते त्यामुळे काळे आणि दलित कोणत्याही वाईट चक्रात न सापडता स्वतःला समृद्ध करते झाले.
खूप सोपं असतं बंडखोरी करून इतरांना त्रास देत रहाणं. उपद्रवमूल्य अधिक असलं की अंजरलं गोंजरलं तरी जातं किंवा पेकाटात लाथ तरी बसते. आपल्याला हीन, दुय्यय वागणूक मिळतेय हे समजलं की स्वतःला प्रगल्भ करणं हाच एकमेव मार्ग असतो जो मुख्य प्रवाहात आणि अग्रभागी आणून ठेवतो. स्वतःला मोठं करणं हे आपल्या हातात असतं, दुसऱ्याची रेघ पुसून स्वतःला कधीही मोठं होता येत नाही. स्वतःची रेघ मजबूत वाढवत न्यायची हाच मार्ग सगळ्यांच्या हिताचा असतो.
#violence_is_the_last_refuge_of_the_incompetent
#रँडम_थोट्स2
स्वतः सबळ होणं, शिक्षित आणि सक्षम होणं हाच एकमेव मार्ग असतो जो आपल्यातली न्यूनगंडाची भावना आणि त्यातून तयार होणारी बंडखोरी कमी करतो. जगातले दोन लढे ह्याबाबत आदर्श असे आहेत. काळ्यांची समानतेसाठीची लढाई आणि महाराष्ट्रातील दलितांची सामाजिक उत्थानाची लढाई. काळे आणि दलित शतकानुशतके अन्याय सहन करून पिचलेले होते , संघर्ष करून त्यातून ते बाहेर आले. ह्या दोन्ही लढ्यात त्यांना मिळालेले नेतृत्व असामान्य होते त्यामुळे काळे आणि दलित कोणत्याही वाईट चक्रात न सापडता स्वतःला समृद्ध करते झाले.
खूप सोपं असतं बंडखोरी करून इतरांना त्रास देत रहाणं. उपद्रवमूल्य अधिक असलं की अंजरलं गोंजरलं तरी जातं किंवा पेकाटात लाथ तरी बसते. आपल्याला हीन, दुय्यय वागणूक मिळतेय हे समजलं की स्वतःला प्रगल्भ करणं हाच एकमेव मार्ग असतो जो मुख्य प्रवाहात आणि अग्रभागी आणून ठेवतो. स्वतःला मोठं करणं हे आपल्या हातात असतं, दुसऱ्याची रेघ पुसून स्वतःला कधीही मोठं होता येत नाही. स्वतःची रेघ मजबूत वाढवत न्यायची हाच मार्ग सगळ्यांच्या हिताचा असतो.
#violence_is_the_last_refuge_of_the_incompetent
#रँडम_थोट्स2
No comments:
Post a Comment