Monday, 4 February 2019


मनाची अवस्था झालीये
निर्वात पोकळी सारखी
याला कारण तुझं नसणं कि
असून नसल्यासारखं दाखवणं
तशीही तुझ्या असण्याची
इतकी सवय चांगली नाही
तु नसताना जीव होतो कासावीस
जे व्हायला नको आहे मला
तू आता जर गेलाच आहेस
कुठंतरी लांब न सांगता
तर बरंच आहे कि
मला हि आजमावता येतील माझ्या भावना
तू आता येऊच नकोस परत
माझ्या भावविश्वात भूकंप घडवायला
ते झेपण्याची ताकत कधीच संपलीये
तसं दिल हलकं नाही आपलं, तरी
तरी ... नकोच येऊस परत कधीही
©अर्चना चंद्रसेन

No comments:

Post a Comment