पुण्यातून सुरेखा पुणेकरला उमेदवारी घोषित होईल ह्याअर्थी बातमी काल टीव्हीवर दाखवली आणि त्यावर सोशल मीडियावरून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या सगळ्या बिलो द बेल्ट होत्या. त्यांना कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळणार होतं ही बाब अलाहिदा पण ज्या तर्हेने त्यावर रिऍक्ट केलं गेलं ते कोणत्याच संस्कारात बसत नाही.
'ह्यांना नाचीच भेटली का' 'आता xxx चा देठ हिरवा होणार' 'बाई दमानं घेणारी हाये' ह्या मी वाचलेल्या काही प्रतिक्रिया अजून बऱ्याच वाचल्यात पण इकडे लिहीत नाही.
सुरेखा पुणेकर कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, बालगंधर्व सारख्या प्रस्थापित नाटकगृहात तमाशा घेऊन जाणारी सुरेखा कोण ओळखत नाही. तुम्ही जर तिला ओळखता, तिचे परफॉर्मन्स युट्युबवर एन्जॉय करता तर तिला नावं ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. केवळ ती बाई आहे आणि तमाशा कलावंत आहे म्हणून पातळी सोडून बोलणार का? ह्यात लायकी तिची दिसते की बोलणाऱ्याची?
ती उघडउघड तमाशा कलावंत आहे, ठोक सुपारी वाजवून तिचे कार्यक्रम थेटरावर लागतात. तो तिचा पेशा आहे. पैसे कमावण्यासाठी तिने स्वतः निवडलेला हा व्यवसाय आहे पण म्हणून ती सगळ्याना अवेलेबल आहे असा अर्थ काढून तिला क्रीटीसाईज करणारे फारच गयेगुजरे आहेत. उलट मी तर म्हणते इच्छा असेल तर तिने नक्की उभं रहावं कारण तिच्यापेक्षा बरबटलेले लोक राजकारणात सन्मानाने मिरवत आहेत. ज्याच्यावर आरोप नाहीत असा राजकारणी दाखवा आणि लाख रुपये मिळवा अशी जाहिरात केली तर रुपाया कुणाला मिळणार नाही अशी इथली परिस्थिती आहे त्यामानाने सुरेखा फार उजळ आहे.
राजकारण फार गचाळ आहे सोनिया ते स्मृती सगळ्यांनाच फार वाईट रितीने बोललं जातं. हेमा मालिनी, जयाप्रदा , प्रियांका गांधी, उर्मिला मातोंडकर अशा अनेक स्त्रिया राजकारणात आहेत आणि अजून येतील. टीका जरूर करावी पण ती लॉजिकल असावी. समोरच्याला वाईट बोलताना आपण आपली लायकी दाखवत असतो हे विसरून चालणार नाही.
'ह्यांना नाचीच भेटली का' 'आता xxx चा देठ हिरवा होणार' 'बाई दमानं घेणारी हाये' ह्या मी वाचलेल्या काही प्रतिक्रिया अजून बऱ्याच वाचल्यात पण इकडे लिहीत नाही.
सुरेखा पुणेकर कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, बालगंधर्व सारख्या प्रस्थापित नाटकगृहात तमाशा घेऊन जाणारी सुरेखा कोण ओळखत नाही. तुम्ही जर तिला ओळखता, तिचे परफॉर्मन्स युट्युबवर एन्जॉय करता तर तिला नावं ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. केवळ ती बाई आहे आणि तमाशा कलावंत आहे म्हणून पातळी सोडून बोलणार का? ह्यात लायकी तिची दिसते की बोलणाऱ्याची?
ती उघडउघड तमाशा कलावंत आहे, ठोक सुपारी वाजवून तिचे कार्यक्रम थेटरावर लागतात. तो तिचा पेशा आहे. पैसे कमावण्यासाठी तिने स्वतः निवडलेला हा व्यवसाय आहे पण म्हणून ती सगळ्याना अवेलेबल आहे असा अर्थ काढून तिला क्रीटीसाईज करणारे फारच गयेगुजरे आहेत. उलट मी तर म्हणते इच्छा असेल तर तिने नक्की उभं रहावं कारण तिच्यापेक्षा बरबटलेले लोक राजकारणात सन्मानाने मिरवत आहेत. ज्याच्यावर आरोप नाहीत असा राजकारणी दाखवा आणि लाख रुपये मिळवा अशी जाहिरात केली तर रुपाया कुणाला मिळणार नाही अशी इथली परिस्थिती आहे त्यामानाने सुरेखा फार उजळ आहे.
राजकारण फार गचाळ आहे सोनिया ते स्मृती सगळ्यांनाच फार वाईट रितीने बोललं जातं. हेमा मालिनी, जयाप्रदा , प्रियांका गांधी, उर्मिला मातोंडकर अशा अनेक स्त्रिया राजकारणात आहेत आणि अजून येतील. टीका जरूर करावी पण ती लॉजिकल असावी. समोरच्याला वाईट बोलताना आपण आपली लायकी दाखवत असतो हे विसरून चालणार नाही.
No comments:
Post a Comment