पंचकन्या मधील एक, ब्रम्हदेवाने स्वतः निर्माण केलेली जगातील सर्वात सुंदर स्त्री. उर्वशीला आपल्या सौन्दर्याचा गर्व झाला म्हणून तिच्याहून सुंदर स्त्री निर्माण करण्यासाठी अहिल्या बनवली गेली असाही उल्लेख आहे. अहिल्या अयोनीज समजली जाते म्हणजे ती जन्माला आली नाही तर तिला निर्माण केलं किंवा मूर्ती घडवतात तशी घडवली. तिच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा आहेत.
अहिल्या जगातील सर्वांग सुंदर स्त्री, ब्रम्हाने मोठी होईपर्यंत गौतम ऋषीला सांभाळ करायला दिली...गौतम ऋषीने ती वयात आल्यावर ब्रम्हदेवाच्या स्वाधीन केलं...ऋषींनी मुलीला नीट सांभाळले , सुखरूप परत केले म्हणून त्यांच्या नैतिकतेवर, नितीमत्तेवर खुश होऊन ब्रम्हदेवाने अहिल्येचा विवाह तिच्याहून वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या गौतम ऋषींशी करून दिला. जगातील सुंदरी आपल्यासाठीच निर्मिल्या जातात असा समज असलेला इंद्र या लग्नामुळे नाराज होतो आणि तप करण्यासाठी निबिड वनात निघून जातो.
अहिल्या आणि गौतम ऋषींच्या विवाहाबद्दल अजूनही एक कथा आहे ज्यात तिचा लहानपणी सांभाळ कुणी केला याबद्दल वरती उल्लेख केला तसंच आहे फक्त तिच्या विवाहासाठी ब्रम्हदेव एक पण ठेवतात , त्यांच्या पणानुसार जो तिन्ही लोकांना सर्वप्रथम फेरी मारेल तो अहिल्येला जिंकून घेईन. इंद्र आपल्या जादुई चमत्कार करून आधी पण पूर्ण करतात , दरम्यान नारद येऊन ब्रम्हदेवास सांगतात की इंद्राच्या आधी गौतम ऋषींनी पण पूर्ण केलाय आणि म्हणून अहिल्या त्यांनी जिंकली. गौतम ऋषींनी बछड्यास जन्म देत असलेल्या सुरभी गाईला फेरी मारली, गाईला प्रदक्षिणा म्हणजे तिन्ही लोकांना फेरा घातला अशी मान्यता असल्याने गौतम ऋषींनी पण जिंकला असं नारद सांगतात. कशाप्रकारे का असेना अहिल्याचा विवाह तिच्यापेक्षा वयाने खूप जास्त असलेल्या गौतम ऋषींशी झाला हे मात्र खरे आणि या विवाहाने इंद्राला मत्सर आणि क्रोधाग्नीत लोटले हेही खरेच. (गौतम ऋषी आणि अहिल्या यांच्यातील संबंध कसे होते हे मला कुठेही वाचायला मिळालं नाही)
लग्नानंतर अहिल्या गौतम ऋषींच्या आश्रमात राहू लागली जो एका नदीकाठी वसलेला होता (एक ठिकाणी मिथिलानगरीजवळ असा उल्लेख आहे). इंद्र अहिल्येच्या रूपाच्या पुरता वश होता, तिच्या जवळ जाण्याची तो संधीच बघत होता. एके दिवशी ऋषी आश्रमात नाहीत असं बघून तो गौतम ऋषींच्या रुपात अहिल्येसमोर हजर झाला. इंद्राने अहिल्येकडे शरीरसंबंध ठेवण्यासाठी मागणी केली आणि प्रेमाराधना केली. एव्हाना अहिल्येने समोर गौतम ऋषींच्या रुपात इंद्रदेव आहे हे ओळखले होतेच तरीही ती त्याला समर्पित झाली. काही कथांमध्ये अहिल्येने इंद्रास सुरवातीला नकार दिला परंतु देवांच्या इच्छेची तृप्ती करणे ही तिचे कर्तव्यच आहे असं सांगून इंद्राने तिचं मन वळवल्याचे सुद्धा सांगण्यात येतं. कशाही तऱ्हेने का असेना इंद्राने अहिल्येचा उपभोग घेतला हे मात्र सगळ्या कथांमध्ये मान्य केलं गेलंय. तिकडे गौतम ऋषींना सगळा प्रकार आंतरज्ञानाने समजतो आणि ते ताबडतोब आश्रमात येतात. अहिल्या आणि इंद्र यांच्या प्रणयाचं वर्णन वाचून एक गोष्ट लक्षात येते की इंद्राने तिच्यावर अत्याचार केले नाहीत. रतीसुखात दोघेही सारखेच सहभागी होते. त्या दोघांनीही रतीसुखाचा अपार आनंद उपभोगला इतका की शेवटी ते दमून थकून नदीच्या काठी झोपी गेले असाही उल्लेख आहे. गौतम ऋषी हे सगळं बघून ते अर्थातच संतप्त झाले आणि त्यांनी पळून जाणाऱ्या इंद्राला शाप दिला की तुझे दोन्ही वृषण कुचकामी होतील (या शापातून इंद्र कसा मुक्त झाला याची मला माहिती नाही) आणि अहिल्येला तू यापुढे जगाच्या नजरेस पडणार नाहीस एक गुमनाम होऊन म्हणजेच दगड होऊन पडशील असा शाप दिला त्यासोबतच श्रीराम जेव्हा तुला भेटतील तेव्हा तुझा उद्धार करतील असा उ:शाप दिला. अहिल्येला शतनंद नावाचा एक पुत्र झाला जे की नंतर मिथलेच्या दरबारी पुजारी होते.
आयुष्याच्या सुरवातीपासून कायम पुरुषी वर्चस्वाखाली राहिलेली अहिल्या फक्त एकदाच स्वतःच्या मनाप्रमाणे वागली आणि त्याचं फळ म्हणून तिला जगापासून दूर रहावं लागलं. उद्धार करायला पुन्हा एकवार पुरुषाचीच गरज लागली. तिने आयुष्य कुठे कंठावे, कुणासोबत विवाह करावा यात कधीही तिचं मत घेण्यात आलेलं नाही. एका दिवसाच्या आनंदाची मात्र जबरी किंमत तिला चुकवावी लागली. घरोघरच्या अहिल्यांबाबत अजूनही परिस्थिती तीच आहे इतका कशाचा पगडा समाजमनावर असावा बरं ?
(टीप - वेळोवेळी वाचलेल्या पौराणिक कथांचा आधार घेऊन वरील लिखाण लिहिलं आहे, याव्यतिरिक्त दुसरी माहितीही असू शकेल हे मला मान्य आहे)
अहिल्या जगातील सर्वांग सुंदर स्त्री, ब्रम्हाने मोठी होईपर्यंत गौतम ऋषीला सांभाळ करायला दिली...गौतम ऋषीने ती वयात आल्यावर ब्रम्हदेवाच्या स्वाधीन केलं...ऋषींनी मुलीला नीट सांभाळले , सुखरूप परत केले म्हणून त्यांच्या नैतिकतेवर, नितीमत्तेवर खुश होऊन ब्रम्हदेवाने अहिल्येचा विवाह तिच्याहून वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या गौतम ऋषींशी करून दिला. जगातील सुंदरी आपल्यासाठीच निर्मिल्या जातात असा समज असलेला इंद्र या लग्नामुळे नाराज होतो आणि तप करण्यासाठी निबिड वनात निघून जातो.
अहिल्या आणि गौतम ऋषींच्या विवाहाबद्दल अजूनही एक कथा आहे ज्यात तिचा लहानपणी सांभाळ कुणी केला याबद्दल वरती उल्लेख केला तसंच आहे फक्त तिच्या विवाहासाठी ब्रम्हदेव एक पण ठेवतात , त्यांच्या पणानुसार जो तिन्ही लोकांना सर्वप्रथम फेरी मारेल तो अहिल्येला जिंकून घेईन. इंद्र आपल्या जादुई चमत्कार करून आधी पण पूर्ण करतात , दरम्यान नारद येऊन ब्रम्हदेवास सांगतात की इंद्राच्या आधी गौतम ऋषींनी पण पूर्ण केलाय आणि म्हणून अहिल्या त्यांनी जिंकली. गौतम ऋषींनी बछड्यास जन्म देत असलेल्या सुरभी गाईला फेरी मारली, गाईला प्रदक्षिणा म्हणजे तिन्ही लोकांना फेरा घातला अशी मान्यता असल्याने गौतम ऋषींनी पण जिंकला असं नारद सांगतात. कशाप्रकारे का असेना अहिल्याचा विवाह तिच्यापेक्षा वयाने खूप जास्त असलेल्या गौतम ऋषींशी झाला हे मात्र खरे आणि या विवाहाने इंद्राला मत्सर आणि क्रोधाग्नीत लोटले हेही खरेच. (गौतम ऋषी आणि अहिल्या यांच्यातील संबंध कसे होते हे मला कुठेही वाचायला मिळालं नाही)
लग्नानंतर अहिल्या गौतम ऋषींच्या आश्रमात राहू लागली जो एका नदीकाठी वसलेला होता (एक ठिकाणी मिथिलानगरीजवळ असा उल्लेख आहे). इंद्र अहिल्येच्या रूपाच्या पुरता वश होता, तिच्या जवळ जाण्याची तो संधीच बघत होता. एके दिवशी ऋषी आश्रमात नाहीत असं बघून तो गौतम ऋषींच्या रुपात अहिल्येसमोर हजर झाला. इंद्राने अहिल्येकडे शरीरसंबंध ठेवण्यासाठी मागणी केली आणि प्रेमाराधना केली. एव्हाना अहिल्येने समोर गौतम ऋषींच्या रुपात इंद्रदेव आहे हे ओळखले होतेच तरीही ती त्याला समर्पित झाली. काही कथांमध्ये अहिल्येने इंद्रास सुरवातीला नकार दिला परंतु देवांच्या इच्छेची तृप्ती करणे ही तिचे कर्तव्यच आहे असं सांगून इंद्राने तिचं मन वळवल्याचे सुद्धा सांगण्यात येतं. कशाही तऱ्हेने का असेना इंद्राने अहिल्येचा उपभोग घेतला हे मात्र सगळ्या कथांमध्ये मान्य केलं गेलंय. तिकडे गौतम ऋषींना सगळा प्रकार आंतरज्ञानाने समजतो आणि ते ताबडतोब आश्रमात येतात. अहिल्या आणि इंद्र यांच्या प्रणयाचं वर्णन वाचून एक गोष्ट लक्षात येते की इंद्राने तिच्यावर अत्याचार केले नाहीत. रतीसुखात दोघेही सारखेच सहभागी होते. त्या दोघांनीही रतीसुखाचा अपार आनंद उपभोगला इतका की शेवटी ते दमून थकून नदीच्या काठी झोपी गेले असाही उल्लेख आहे. गौतम ऋषी हे सगळं बघून ते अर्थातच संतप्त झाले आणि त्यांनी पळून जाणाऱ्या इंद्राला शाप दिला की तुझे दोन्ही वृषण कुचकामी होतील (या शापातून इंद्र कसा मुक्त झाला याची मला माहिती नाही) आणि अहिल्येला तू यापुढे जगाच्या नजरेस पडणार नाहीस एक गुमनाम होऊन म्हणजेच दगड होऊन पडशील असा शाप दिला त्यासोबतच श्रीराम जेव्हा तुला भेटतील तेव्हा तुझा उद्धार करतील असा उ:शाप दिला. अहिल्येला शतनंद नावाचा एक पुत्र झाला जे की नंतर मिथलेच्या दरबारी पुजारी होते.
आयुष्याच्या सुरवातीपासून कायम पुरुषी वर्चस्वाखाली राहिलेली अहिल्या फक्त एकदाच स्वतःच्या मनाप्रमाणे वागली आणि त्याचं फळ म्हणून तिला जगापासून दूर रहावं लागलं. उद्धार करायला पुन्हा एकवार पुरुषाचीच गरज लागली. तिने आयुष्य कुठे कंठावे, कुणासोबत विवाह करावा यात कधीही तिचं मत घेण्यात आलेलं नाही. एका दिवसाच्या आनंदाची मात्र जबरी किंमत तिला चुकवावी लागली. घरोघरच्या अहिल्यांबाबत अजूनही परिस्थिती तीच आहे इतका कशाचा पगडा समाजमनावर असावा बरं ?
(टीप - वेळोवेळी वाचलेल्या पौराणिक कथांचा आधार घेऊन वरील लिखाण लिहिलं आहे, याव्यतिरिक्त दुसरी माहितीही असू शकेल हे मला मान्य आहे)
No comments:
Post a Comment