कुठल्याही व्यक्तीला मिळणारा सन्मान हा प्रथमदर्शनी कशावर असतो? तुमचं राहणीमान क्लासी असेल,सगळं श्रीमंती थाटात असेल तर मान देणारे देतात ते तुमच्यातल्या व्यक्तीला नसून तुमच्या कडच्या पैशाला मान देतात. हा मिळणारा सन्मान तात्पुरता असतो जर तुम्ही माणूस म्हणून चोख नसाल तर पैशालाही कुणी विचारत नाही. माझ्या बघण्यात अशी एक बाई आहे , भरपूर पैसा असलेली , हरएक काम पैसा टाकून करून घेणारी...हळूहळू सगळ्यांना समजत गेलं की इथे तर आपण विकलो गेलो, आणि ती बाई लोकांच्या मनातून उतरत गेली पण लोकं इतके उपकराच्या ओझ्याखाली दबले गेले होते की ती सांगेल ती कामं ही लोकं निमूट करून देत. मागे तिला शिव्या देत पण तोंडावर मॅडम मॅडम करून कौतुकं करण्याशिवाय गत्यंतरच न्हवतं. ह्या प्रकरणात मिळणारा मान मिथ्या आणि विकतचा असतो.
अजून एक प्रकार म्हणजे दिखावा. कॅराक्टर म्हणजे चारित्र्य कसेही असलं तरी स्वच्छ , शुद्ध असल्याचा दिखावा करून बेमालूनपणे इतरांकडून मान सन्मान मिळवणारी मंडळी आजूबाजूला पोत्यानी सापडतील. रात्री पिऊन झिंगायचं, नळ्या फोडून , सगळी लफडी करून सकाळी अंघोळ पांघोळ करून हरी ओम म्हणायला मोकळे. चार भिंतीच्या आत घातलेला गोंधळ बाहेर गेला नाही की तुम्ही साजूक असता. अंतर्बाह्य पावित्र्य मिळणं जवळपास दुरापास्त आहे आणि तसा अट्टाहासही कुणी करू नये.
तुमची प्रतिष्ठा, रेप्युटेशन, मिळणारा मान हा बरेचदा तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता यावर असतो भले तुम्ही तसे नसलात तरीही पण एकदा का भ्रमाचा भोपळा फुटला की लोकांच्या नजरेतून उतरने सहन करायला मोठी ताकद लागते, भले भले इथे गारद होतात. मी पणा सगळ्यात घातक असतो, मी पणा करणारे कितीही थोर असले तरी फार काळ लोकांच्या मनात घर करू शकत नाहीत. मी पणा, गर्व सगळ्या कर्तबगारीवर पाणी फिरवतो.
आपल्या पैशाला, आपण कुणाच्या उपयोगी पडतो म्हणून जर कुणी आपला आदर आणि सन्मान करत असेल तर समोरची व्यक्ती स्वार्थी असते आणि आपली एकाअर्थी व्यक्ती म्हणून हार असते. फक्त पैशाने सन्मान मिळतो म्हणजेच तुमच्यातला माणूस कुणीच मोजला नाही.
स्वच्छ, शुद्ध चारित्र्य सांगून समजत नाही, जो सांगतो मी चारित्र्यवान आहे तो खोटारडा असतो...ही गोष्ट न सांगता इतरांना जाणवायला हवी.
चारित्र्याच्या कल्पना समाजनिहाय बदलत असतात. एखाद्या समाजात दारू पिणे, अनेक स्त्रियांशी संबंध असणे म्हणजे नीचपणा असतो पण ह्याच गोष्टी दुसऱ्या समाजात सर्वसामान्य असतात. आपण ज्या समाजात रहातो त्या चौकटीतील नियम पाळले की तुम्ही चारित्र्यवान असता नाहीतर गयेगुजरे, बिघडलेले म्हणून ठप्पा बसलाच समजा. रहाता तिथले नियम गुमान पाळा नाहीतर चारित्र्यहीन म्हणवून घ्या.
समाजाच्या चौकटी मोडायला धमक लागते आणि अशी भरपूर माणसं आपल्या समाजात होवून गेलीत. आपले सगळे समाजसुधारक चौकटी मोडून जगले आणि इतरांसाठी एक मार्ग प्रशस्त करून गेले. अजुन बऱ्याच भिंती तोडायच्या बाकी आहेत, काही नवीन भिंती बांधल्या जातात...
अजून एक प्रकार म्हणजे दिखावा. कॅराक्टर म्हणजे चारित्र्य कसेही असलं तरी स्वच्छ , शुद्ध असल्याचा दिखावा करून बेमालूनपणे इतरांकडून मान सन्मान मिळवणारी मंडळी आजूबाजूला पोत्यानी सापडतील. रात्री पिऊन झिंगायचं, नळ्या फोडून , सगळी लफडी करून सकाळी अंघोळ पांघोळ करून हरी ओम म्हणायला मोकळे. चार भिंतीच्या आत घातलेला गोंधळ बाहेर गेला नाही की तुम्ही साजूक असता. अंतर्बाह्य पावित्र्य मिळणं जवळपास दुरापास्त आहे आणि तसा अट्टाहासही कुणी करू नये.
तुमची प्रतिष्ठा, रेप्युटेशन, मिळणारा मान हा बरेचदा तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता यावर असतो भले तुम्ही तसे नसलात तरीही पण एकदा का भ्रमाचा भोपळा फुटला की लोकांच्या नजरेतून उतरने सहन करायला मोठी ताकद लागते, भले भले इथे गारद होतात. मी पणा सगळ्यात घातक असतो, मी पणा करणारे कितीही थोर असले तरी फार काळ लोकांच्या मनात घर करू शकत नाहीत. मी पणा, गर्व सगळ्या कर्तबगारीवर पाणी फिरवतो.
आपल्या पैशाला, आपण कुणाच्या उपयोगी पडतो म्हणून जर कुणी आपला आदर आणि सन्मान करत असेल तर समोरची व्यक्ती स्वार्थी असते आणि आपली एकाअर्थी व्यक्ती म्हणून हार असते. फक्त पैशाने सन्मान मिळतो म्हणजेच तुमच्यातला माणूस कुणीच मोजला नाही.
स्वच्छ, शुद्ध चारित्र्य सांगून समजत नाही, जो सांगतो मी चारित्र्यवान आहे तो खोटारडा असतो...ही गोष्ट न सांगता इतरांना जाणवायला हवी.
चारित्र्याच्या कल्पना समाजनिहाय बदलत असतात. एखाद्या समाजात दारू पिणे, अनेक स्त्रियांशी संबंध असणे म्हणजे नीचपणा असतो पण ह्याच गोष्टी दुसऱ्या समाजात सर्वसामान्य असतात. आपण ज्या समाजात रहातो त्या चौकटीतील नियम पाळले की तुम्ही चारित्र्यवान असता नाहीतर गयेगुजरे, बिघडलेले म्हणून ठप्पा बसलाच समजा. रहाता तिथले नियम गुमान पाळा नाहीतर चारित्र्यहीन म्हणवून घ्या.
समाजाच्या चौकटी मोडायला धमक लागते आणि अशी भरपूर माणसं आपल्या समाजात होवून गेलीत. आपले सगळे समाजसुधारक चौकटी मोडून जगले आणि इतरांसाठी एक मार्ग प्रशस्त करून गेले. अजुन बऱ्याच भिंती तोडायच्या बाकी आहेत, काही नवीन भिंती बांधल्या जातात...