उंटाचे व्यापारी वगैरे आता कालबाह्य प्रकरण झालंय, उंटाच्या व्यापाऱ्याची गोष्ट मात्र चिरकाल टिकणारी आहे. उंटाचा व्यापारी त्याचे पाचशे उंट घेऊन बाजारात विकायला निघालेला असतो. वाटेत रात्रीचा मुक्काम करायला एका धर्मशाळेशी तो थांबतो. रात्रीच्या वेळी उंट इकडेतिकडे पांगतील म्हणून तो सगळे उंट खुंटे ठोकून दोरीने बांधून टाकतो. चारशे नव्यान्नव उंट बांधून झाल्यावर उरलेल्या एका उंटासाठी त्याच्याकडे खुंटा आणि दोरी नसते. प्रवासात बहुतेक कुठे गहाळ झाले असावेत, उंटाचा व्यापारी एक खुंटा आणि दोरी मागण्यासाठी धर्मशाळेच्या मालकाकडे जातो. मालकाकडे सुद्धा खुंटा आणि दोरी नसते, मालक त्याला म्हणतो की बाकीचे उंट सोडून एकटा उंट कुठे जाणार नाही त्यामुळे काळजी नको करुस. मागच्या एका अनुभवातून उंटाचा व्यापारी म्हणतो की बांधून ठेवलं नाही तर उंट रात्रीतून उठून खूप लांबवर निघून जातात, त्याचे काही अशारीतीने उंट गायब झालेले तो धर्मशाळामालकाला सांगतो. धर्मशाळामालक थोडा वेळ डोकं खाजवून एक आयडिया उंटाच्या व्यापाऱ्याला सांगतो. तू खुंटा ठोक आणि दोरी बांध आणि झोपायला निघून जा, खरा खुंटा तर नाही पण तशी अकटिंग कर आणि बिनधास्तपणे झोपून जा. दुसरा पर्यायच नसल्याने उंटव्यापारी तसंच करतो. काल्पनिक खुंटा ठोकतो , दोरी बांधतो आणि झोपून जातो. सकाळी उठल्यावर व्यापारी बघतो तर ज्याला खुंटादोरी नाही तो उंटसुद्धा तसाच बसून असतो. व्यापारी मग एकेक करून सगळ्या उंटाना सोडतो तसे ते सगळे अंग झटकून उभे रहातात. बिनखुंट्यादोरीचा उंट मात्र अजून बसून असतो. व्यापारी त्याला चुचकारतो, उभं रहा म्हणतो तरी तो हलत नाही. धर्मशाळामालक ते सगळं बघत असतो... न राहवून तो व्यापाऱ्याला सांगतो की रात्री तू खुंटा बांधलास तसाच तो काढून टाक. उंटाचा व्यापारी मग तो न ठोकलेला खुंटा उपसतो आणि न बांधलेली दोरी सोडतो तेव्हा कुठे तो उंट जागेवरून हालतो.
खुंटा आणि दोरी नसतेच तरी ती आहे हे समजून उंट वागतो ; आपली जागा सोडत नाही, तेच प्रत्येकजण करत असतो. अशा अनेक अनामिक खुंट्या आणि दोऱ्याला जखडून माणूस जगत असतो. भीती, द्वेष, घृणा, घमेंड अशा अनेक आणि अगणित खुंट्याला आपण आपल्यालाच बांधून घातलेले असतं. जोवर हे बंध सैलावत नाहीत तोवर आपला परीघ मर्यादित असतो, तिथल्या तिथे घुटमळणे होत राहते. नीतिमत्तेच्या खुंट्याला बांधून ठेवून इतर खुंट्या आपणच आपल्या तोडून टाकायच्या. ज्यांचे पंख बांधलेले, जड तितकी त्यांची उडान तोकडी. पंख गरुडाचे असतात पण त्यावरचं बारीक, छोट्याशा खड्याचं ओझंही त्याची भरारी छाटून टाकते.
There is always room on top
Bottom is crowded
स्वतःला अवळलेल्या दोऱ्या, पंखावरची ओझी, भार झटकून बंधमुक्त होत जाल तितकी भरारी आणि दौड सहज, सोपी आणि दूरवर होत जाईल. आपण कोणत्या खुंट्याला बांधलोय हे माहीत असणे हे तो तोडायची पहिली पायरी असते ... मग काय तोडताय ना खुंट्या !
#ऐकलेल्या_गोष्टी
#थिंक_पॉझिटिव्ह
©अर्चना चंद्रसेन
खुंटा आणि दोरी नसतेच तरी ती आहे हे समजून उंट वागतो ; आपली जागा सोडत नाही, तेच प्रत्येकजण करत असतो. अशा अनेक अनामिक खुंट्या आणि दोऱ्याला जखडून माणूस जगत असतो. भीती, द्वेष, घृणा, घमेंड अशा अनेक आणि अगणित खुंट्याला आपण आपल्यालाच बांधून घातलेले असतं. जोवर हे बंध सैलावत नाहीत तोवर आपला परीघ मर्यादित असतो, तिथल्या तिथे घुटमळणे होत राहते. नीतिमत्तेच्या खुंट्याला बांधून ठेवून इतर खुंट्या आपणच आपल्या तोडून टाकायच्या. ज्यांचे पंख बांधलेले, जड तितकी त्यांची उडान तोकडी. पंख गरुडाचे असतात पण त्यावरचं बारीक, छोट्याशा खड्याचं ओझंही त्याची भरारी छाटून टाकते.
There is always room on top
Bottom is crowded
स्वतःला अवळलेल्या दोऱ्या, पंखावरची ओझी, भार झटकून बंधमुक्त होत जाल तितकी भरारी आणि दौड सहज, सोपी आणि दूरवर होत जाईल. आपण कोणत्या खुंट्याला बांधलोय हे माहीत असणे हे तो तोडायची पहिली पायरी असते ... मग काय तोडताय ना खुंट्या !
#ऐकलेल्या_गोष्टी
#थिंक_पॉझिटिव्ह
©अर्चना चंद्रसेन
खुप अवघड असतं या अदृश्य बेड्या तोडणं. मुळात त्या बेड्या आहेत हेच समजत नाही कित्येकदा अनेकांना.
ReplyDelete