निधि फार निराश,हताश झाली होती. रवीने तिला खूप मोठा मानसिक धक्का दिला होता. निधि एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला होती, रवीची आणि तिची तिथच भेट झाली , दोघांचे प्रेम जमले, लग्नाचा विचार अजून जरी केला नसला, तरी ते कपल आहेत, हे सगळ्यांनाच माहीत होते, दोन्ही कुटुंबाचा अजिबात विरोध नव्हता, विरोध असण्याच कारणच नव्हते, दोघे एकमेकांना एकदम अनुरूप होते. पण कुठे माशी शिंकली , आणि एक दिवस रवीने तिला सांगितलं, की तो तिच्यात इंटरेस्टेड नाहीये, त्याला दुसरीच कुणी जास्त आवडू लागली होती. तिच्याघरचे खूप समजावत होते पण तो शहर सोडून निघुन गेला. तिने स्वतःला कोंडून घेतलं , हाताची शिर कापून घेतली रवीशिवाय आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हती निधि,तिच्या मैत्रिणीने फोन केला बराच वेळ फोन उचलला नाही, तेव्हा सगळे धावत आले, दार तोडून, तिला दवाखान्यात नेलं, डॉक्टर म्हटले तिच्या मनावर मोठा आघात झालाय , काळजी घ्यायला हवी.
निधिला आता कुणीच एकटे सोडत नव्हते , सतत कुणींना कुणी सोबत असायचे. सध्या जॉबवरुन सुट्टीच घेतली होती, टाइमपास साठि सहजच कम्प्युटर सुरू केला आणि नकळत मेसेंजरच्या चॅटरूम मध्ये गेली, लगेच एक मेसेज समोर आला 'हाय,आय अॅम शाहरुख खान, आप कौन' तिला माहीत होत चॅटरूम मध्ये सगळेच शाहरुख,सलमान बनून फिरतात 'मी, रोझ म्हणजे गुलाब' तिने उत्तर टाइप केल, नकळत त्यांच्या गप्पा सुरू झाल्या वेळ कसा गेला कळलच नाही 'मै कल फिर ईसी टाइम आता हूं, रोजा खोलना है' इतके बोलून तो अचानक offline झाला, 'अरे, हा तर मुस्लिम होता' तिच्या डोक्यात पहिला विचार हाच आला, असू दे चॅटरूममध्ये एकदा भेटलेला माणूस परत भेटण्याची शक्यताच नसते, तिला माहीत होत.
दुसर्यादिवशी, त्याच वेळेला ती चॅटरूममध्ये गेली तो होताच,ते छान गप्पा मारू लागले , मग हे रोज सुरू झाले ठराविक वेळेला तो online यायचा त्याचा वेळ झाला की जायचा. तिने त्याला आपली खरी माहिती दिली नव्हती, त्यानेपण नव्हती दिली, ते एकमेकाशी खूप आनंदाने गप्पा मारायचे एकमेकाचे छंद, आवडीनिवडी सगळे त्याना समजले होत. निधीच्या घरचेहि तिच्याबाबत थोडे रीलॅक्स झाले. सलग 8 दिवस अस सुरू होतं, रवीच्या आठवणी तिला आता पूर्वीइतक्या छळेनाशा झाल्या. शाहरुख तिला आवडू लागला. रात्री ती विचार करू लागली, रविवर खरोखर प्रेम केल का मी, नाही म्हणावं तर लगेच हा कसा आवडू लागला , एक गोष्ट मात्र तिला नक्की समजली आता रवी तिच्या आयुष्यात राहिला नव्हता. निधि आता पुर्णपणे वेगळ्या वाटेन निघाली.
एका रात्री एक वाजता निधिने त्याला sms केला, लगेच उत्तर आल, मेसेज बरोबर sms चा सिलसिला सुरू झाला, त्या दोघांनी एकमेकांना पाहिले नव्हते, एकदा तिने आपला फोटो त्याला पाठवला, आणि त्याचा मागितला, पण त्याने काही दिला नाही, 'मी तुझ्याइतका देखणा दिसत नाही जान' ,'जान, हो तू माझी जान आहेस, तुझ्या शिवाय मला काही सुचत नाही, पण मी तुझ्या योग्य नाही गं' ती म्हटली 'तू कसाही असलास तरी तुझ मन खूप छान आहे, तू मला उद्या भेटशील का, नक्की भेट नाही तर मी बोलणार नाही कध्धी'
सकाळीच निधिला फोन आला 'मै आपसे कुछ कहेना चाहता हूं ' निधिने विचारले 'ठीक है' 'जी,मेरा नाम शाहरुख नाही , शकील है', निधि म्हटली 'कोई बात नाही , मै भी रोझ नही , निधि हूं'. दोघेही मनापासून हसले, 'और एक बात , मै शादिशुदा हूं, और दो बच्चे है मेरे' आता मात्र निधीला थोड विचित्र वाटलं 'ठीक है, मी मराठीत बोलू का ' 'हो, समजत मला'. 'लग्न झाल असून तुम्ही एखाद्या मुलीशी कस काय इतके बोलता' निधीन विचारले 'माझा डावा हात फ्रॅक्चर होता, त्यामुळे मी घरातच अडकून पडलो होतो, टाइमपास करायला चॅट करायचो, आता प्लास्टर काढलय, तुमचं बोलण मला आवडू लागलं होत, आणि तुमच्या बोलण्यात एक प्रकारची उदासी जाणवायची मला , म्हणून मी बोलत गेलो , आणि गुंतत गेलो, पण सॉरीमाझ्यामुळे तुम्हाला कदाचित त्रास झाला असेल' निधि सुन्न झाली.
'पण मी खरच तुझ्यावर प्रेम करू लागलोय गं, मी लग्न करायला तयार आहे, माझ्या मजहब मध्ये चालते दुसरी बायको, माझी पहिली बायको काही बोलणार नाही, मी समजावेल तीला, आणि माझा बिझनेस पण चांगला चालतो, तू काळजी करू नकोस जान' निधि थोडा वेळ शांत बसली मग ती बोलू लागली 'शकिल, मला तू खूप आवडतोस रे, तू मला खूप अडचणीच्या वेळी आधार दिलास, नाही तर तुझी निधि आज वेडी झाली असती. मी आज आणि नेहमीच तुझीच राहील, पण दुसर्या स्त्रीच्या हक्कावर मी आक्रमण नाही करू शकत रे, तुझ्या मजहब मध्ये असेल पण माझ मन मला परवानगी देत नाही. पण मी आता तुला 100 टक्के सांगते की जर मला कधीही तुझी गरज लागली, जेव्हा कधी मला लग्न करायची इच्छा होईल तेव्हा मी तुझ्याकडेच येईल, पण अत्ता मला आग्रह करू नकोस, मी उद्या नवीन कंपनी जॉइन करणार आहे , मोठ्या संधि आहेत, तू माझी काळजी करू नकोस, तू सुखी रहा ' इतक बोलून निधिने फोन खाली ठेवला, तिला कधी न्हवे ते खूप मोकळे वाटत होते, आत्महत्येचा विचार सुदधा तिच्या मनाला शिवला नव्हता, कसा शिवणार , रवीने तिला सोडले होते आणि आज दूसरा कोणीतरी तिचा स्वीकार करायला तयार होता, तिला खात्री होती शकिल तिची वाट पाहणार होता, कुणीतरी आपल्यावर प्रेम करतय आपली वाट पहातय हा विचारच आनंददायक होता आणि ती परत त्याच्याकडेच जाणार होती, कारण तो तिचा प्राण आणि ती त्याची जान होती.